दैनिक परिपाठ
21 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
🔺️ दिनविशेष
१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
१९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
२०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : टिकाव लागणे-अर्थ : निभाव लागणे, तगून राहणे.
▪️वाक्य : बंडोपंतांच्या बुद्धिबळ खेळण्याच्या चातुर्यापुढे कोणाचा टिकाव लागेल बरे!
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे
▪️अर्थ : एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.
🔺️ कोडे
▪️ सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
▪️उत्तर - पावसाने भिजलेल्या भूमीचा सुगंध.
🔺️ सामान्यज्ञान
१) तिहार जेल कोठे आहे ?
उत्तर - दिल्ली
२) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?
उत्तर - डॉ. राजेंद्र प्रसाद
३) भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण ?
उत्तर - डॉ. झाकीर हुसेन
४) भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण ?
उत्तर - ग्यानी झैलसिंग
५) राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण ?
उत्तर - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
🔺️ बोधकथा
मांजराच्या गळ्यात घंटा
एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.
हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.
सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.
सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुशारीचा फार अभिमान वाटला.
तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.
उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon