दैनिक परिपाठ
10 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
🔺️ दिनविशेष
१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : चाहूल लागणे-अर्थ : कानोसा लागणे, लक्षात येणे.
▪️वाक्य : आपल्यामागे कोणीतरी चालत आहे, याची सुरेंद्रला चाहूल लागली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
▪️अर्थ : वेळ सगळ्यांवर येते.
🔺️ कोडे
▪️ मा र्णि मा पौ ळी ना र कोणता सण ?
▪️उत्तर - नारळी पौर्णिमा
🔺️ सामान्यज्ञान
१) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद
२)माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003
३) RIP full form मराठीत काय आहे?
उत्तर : Rest in peace आत्म्याला शांती मिळो.
४)सीआरपीएफ चा फुल फॉर्म
(CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स
(Central Reserve Police Force)
५) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि
Chris DeWolfe.
🔺️ बोधकथा
खरी संपत्ती
रामू नावाचा एक शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करत असे . त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत असे. त्याला तीन मुले होती .तीनही मुले खूप आळशी होती .त्यामुळे त्याला सतत चिंता वाटत असे की, आपल्यानंतर या मुलांचे कसे होणार? काही दिवसांनी रामू खूप आजारी पडला. त्याने आपल्या तीनही मुलांना जवळ बोलावले .तो म्हणाला," मी काही ह्या आजारातून बरा होईल असे वाटत नाही. तेव्हा जाता जाता एक गुपित सांगतो. आपल्या शेतात खूप धन ठेवलेले आहे." असे सांगितल्यानंतर काही वेळातच त्याचा जीव गेला.
कष्ट न करता धन मिळणार याचा मुलांना खूप आनंद झाला .हे धन शेतात नक्की कोणत्या ठिकाणी ठेवले आहे याची त्यांना माहिती नव्हती . त्यामुळे त्यांनी सर्व शेती खणून काढली . त्यांना कोठेही धन मिळाले नाही. शेवटी त्यांनी आयत्या धनाची आशा सोडून दिली आणि इतके खणले आहेच तर त्यात धान्य पेरून देऊ. असा विचार केला आणि त्यांनी धान्य पेरले.
भरपूर केलेल्या कष्टामुळे त्यावर्षी पीकही भरपूर मिळाले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना वडिलांच्या सांगण्याचा अर्थ समजला की शेतात खूप कष्ट केल्यावरच आपणास धन मिळेल. अशा तऱ्हेने त्यांना कष्टाचे महत्त्व समजले.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon