दैनिक परिपाठ
03 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
🔺️ दिनविशेष
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : आडवे होणे- झोपणे.
▪️वाक्य : खूप काम केल्यावर आई दुपारी जरा आडवी होते.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
▪️अर्थ : क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
🔺️ कोडे
▪️ लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हरतो, ओळखा पाहू मी कोण?
▪️उत्तर- चुंबक
🔺️ सामान्यज्ञान
1) नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या
खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर - कार रेसिंग
2) खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या
राज्यात आहेत ?
उत्तर - मध्य प्रदेश
3) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक
चार यांचा पिन कोड काय आहे?
उत्तर - 400016
4) लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या
नावे आहे?
उत्तर - माईक पोवेल
5) कालावल खाडी कोणत्या नदीच्या
मुखाशी आहे?
उत्तर - तेरेखोल
🔺️ बोधकथा
खरा कवी
एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली की या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली, "या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा." तरीही १०-२० उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली कि या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता की त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला, "महाराज ! राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेंव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेंव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो." राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होवून त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला 'राजकवी' म्हणून घोषित केले.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon