
दैनिक परिपाठ
22 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️ सुविचार
काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कर्तव्य म्हणून कराव्या लागतात.
🔺️ दिनविशेष
२००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
१९९९ : ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
१९७१ : सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४७ : भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : बाचाबाची होणे - तोंडी भांडण होणे किंवा शाब्दिक चकमक होणे.
▪️वाक्य : अजय आणि विजयमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : काप गेले नी भोके राहिली
▪️अर्थ : सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
🔺️ कोडे
▪️वढीशी नन्नुबाय,
साऱ्या वाटणं गीत गाय
▪️उत्तर: शिट्टी
🔺️ सामान्यज्ञान
1) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तर : 1 मे 1960
2) मानवी शरीराचे तापमान किती असते?
उत्तर : साधारण ९८.६°F किंवा ३७°C
3) भारताचे प्रथम नागरिक आणि तिन्ही दलांचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
4) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : २७ फेब्रुवारी
5) 'शून्य'चा शोध कोणी लावला?
उत्तर : भारत
🔺️ बोधकथा
गर्व आणि नम्रता
एका मोठ्या नदीच्या काठी लव्हाळा आणि एक मोठे झाड असे दोघे राहत होते. ते झाड स्वतःच्या उंचीवर आणि मजबुतीवर खूप गर्विष्ठ होते. ते नेहमी लव्हाळ्याला म्हणायचे, "बघ, मी किती शक्तिशाली आहे! वादळ आले तरी मी ताठ उभा राहतो, आणि तू मात्र वाऱ्याच्या एका झुळुकीनेही वाकतोस."
लव्हाळा शांतपणे हसून म्हणाला, "दादा, वेळीच वाकण्यातच खरी शक्ती असते."
काही दिवसांनी तिथे एक प्रचंड वादळ आले. वारा वेगाने वाहू लागला. ते मोठे झाड स्वतःच्या ताकदीच्या जोरावर वाऱ्याचा प्रतिकार करू लागले. ते ताठ राहिले, पण वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की शेवटी ते मोठे झाड मुळे उपटून जमिनीवर कोसळले.
दुसरीकडे, तो छोटा लव्हाळा वाऱ्याच्या दिशेने जमिनीपर्यंत वाकला. जेव्हा वादळ शांत झाले, तेव्हा लव्हाळा पुन्हा ताठ उभा राहिला. गर्विष्ठ झाड मात्र कायमचे नष्ट झाले होते.
तात्पर्य: अति गर्व नेहमी माणसाचा विनाश करतो, तर नम्रता संकटातही आपल्याला तारून नेते.
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon