दैनिक परिपाठ
05 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !
🔺️ दिनविशेष
२००४ : ’संभाजी ब्रिगेड’ या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
१९९८ : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
१९९७ : रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
१९७४ : अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद
📋 बातम्या
▪️वाक्प्रचार व अर्थ : तणतणत निघून जाणे- खूप रागाने निघून जाणे.
▪️वाक्य : आईचे बोलणे ऐकून अन्सार तणतणत निघून गेला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : तहान लागल्यावर विहीर खणणे
▪️अर्थ : एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे
🔺️ कोडे
▪️मान असून डोके नाही .
▪️उत्तर-बाटली
🔺️ सामान्यज्ञान
१) ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' हे कोणी म्हटलेलं आहे ?
उत्तर - स्वातंत्र्यवीर सावरकर
२) भारतावर सर्वात जास्त वर्षे राज्य करणारे कोण ?
उत्तर - इंग्रज
३) रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजांना कोणती पदवी परत दिली ?
उत्तर - सर
४) जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य असणारा देश ?
उत्तर - भारत
५) तीन रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
उत्तर - तिठा
🔺️ बोधकथा
बोधकथा: कष्टाचे फळ
एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण त्याची चारही मुले मात्र अतिशय आळशी होती. शेतकरी म्हातारा झाला होता आणि त्याला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत होती.
एके दिवशी शेतकऱ्याने चौघांनाही जवळ बोलावले आणि सांगितले, "मुलांनो, आता मी जास्त दिवस जगणार नाही. आपल्या शेतात मी एक गुप्त धन पुरून ठेवले आहे. माझ्या पश्चात तुम्ही ते उकरून काढा आणि सुखाने राहा."
काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वडिलांनी सांगितलेल्या 'गुप्त धना'च्या आशेने चौघा भावांनी संपूर्ण शेत उकरून काढले. पण त्यांना तिथे कुठेही सोन्या-नाण्याचे हंडे सापडले नाहीत. ते खूप निराश झाले.
त्याच वेळी पावसाळा सुरू झाला. शेत उकरलेले होतेच, म्हणून त्यांनी त्यात बी-बियाणे पेरले. त्या वर्षी शेतात इतके उत्तम पीक आले की, ते विकून त्यांना खूप पैसे मिळाले. तेव्हा त्यांना वडिलांच्या शब्दांचा खरा अर्थ उमजला. कष्ट हेच खरे 'गुप्त धन' होते.
तात्पर्य (Moral of the story):
"कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे."
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)




ConversionConversion EmoticonEmoticon