सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 288 दि.21/07/2022

               छान छान गोष्टी भाग 288 

वाचा रे वाचा!






       गुरूवार दि.21/07/2022

चोरी करणे वाईट असते

एकदा दुपारी ऊन खूप तापलेल होत. गुराखी आपली जनावर घेऊन झाडाखाली विश्रांती घेत होते. पशु-पक्षी झाडावर सावलीत बसली होती.

तेवढयात काही उनाड मुल एका पेरूच्या व संत्रीच्या बागेत शिरली. त्या सर्व मुलांनी तेथील रखवालदाराची नजर चुकवून पेरू व संत्री तोडले. काहींनी खिसे भरून घेतले, तर काहींनी डोक्यावरच्या रूमालात बांधून घेतले. आणि ते सर्वजण बागेबाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी सर्वांनी पोटभर पेरू व संत्रे खाल्ले. ती मुल फिरत ज्याठिकाणी बाबा बसले होते तेथे आली. बाबा तेथे चिंतन करत बसले होते. चिंतन संपवून डोळे उघडल्यावर बाबांना समोर मुलांचा घोळका दिसला. बाबांच्या लगेच लक्षात आले की, ‘हया मुलांनी रखवालदाराच्या नकळत पेरू व संत्री आणली आहेत.’

बाबांनी त्यांना विचारले, “काय रे बाळांनो, तुम्ही काय आणले आहे. आंबे खाता आहात काय?” ते ऐकून मुलांना आनंद वाटला. त्यांनी बाबांना धीटपणे सांगितले, “बाबा, हे आंबे नाहीत. आम्ही पेरू व संत्री आणले आहे, त्या बागेतून.”

एक मुलगा संत्री बाबांच्या पुढे करून म्हणाला, “बाबा, आपण खाणार का?”

बाबा त्याला म्हणाले, “का नाही खाणार? मी खाणार आहे, परंतु ते चोरून आणलेले नसतील तर” ते ऐकून मुल एकदम शांत झाली. कोणीही काही बोलल नाही. बाबा त्यांना म्हणाले, तुम्ही काही बोलत नाही, म्हणजे खरोखरच तुम्ही हे चोरून आणले आहे.” 

त्याबरोबर सर्व मुल खालच्या आवाजात म्हणाली, “होय बाबा, आम्ही हे सारे चोरून आणले आहे.” बाबा त्यांना म्हणाले, “ठिक आहे, म्हणजे तुमची चूक तुम्हाला कळाली आहे. हे खूप आहे. तुम्ही माझ ऐकाल का?”

मुल म्हणाली, “बाबा आम्ही तुमचे ऐकू.” 

तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, “ठीक आहे. तुम्ही आता त्या बागेतील रखवालदाराकडे जा, व त्याला सांगा की, आम्ही तुमच्या बागेतून हि फळे चोरलेली आहेत. त्याची माफी मागा व यापुढे आम्ही कधीही असे करणार नाही, असे सांगा.” 

मुलांनी बाबांना हो सांगितले व ती लगेचच बागेत जाऊन रखवालदारच्या समोर उभी राहिली. व त्यातील एक मुलगा म्हणाला, “मामा आम्हाला माफ करा, आम्ही तुमची नजर चुकवून दूपारी संत्री व पेरू तोडून नेली. यापुढे आम्ही असे करणार नाही. आमची चूक झाली आहे. बाबांमुळे आमचे डोळे उघडले आहे. म्हणून ही फळे आम्ही तुम्हाला परत करत आहोत.” 

रखवालदाराने मुलांना विचारले, “बाबांनी तुम्हाला असा कोणता शब्द वापरला आहे.” 

मुल म्हणाली, “आम्ही चोरी करणार नाही.” 

तेव्हा रखवालदार मामा म्हणाले, “ठिक आहे. तुमचा प्रामाणिकपणा पाहून मी तुम्हाला ही सर्व फळे भेट देत आहे. तुम्ही ती घ्या. परत कधी तुम्हाला फळे खायची इच्छा झाली तर माझ्या समोर तोडून खा.” ते ऐकून मुलांना खूप आनंद झाला. ती बाबांकडे गेली व म्हणाली, “बाबा, आम्ही त्यांची माफी मागितली तेव्हा त्यांनी आम्हाला माफ केले. व ती फळे परत आम्हाला दिली. आता ती तुम्ही खाणार ना!” बाबांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. नंतर सर्वजण एकत्र बसून बाबांबरोबर फळ खाऊ लागली. खातना बाबा त्यांना म्हणाले, लक्षात ठेवा मुलांनो, कधीही चोरी करून नये. माणसाने नेहमी आपल्या कष्टाचे खावे. चोरीच धन घेऊ नये, चोरीच अन्न खाऊ नये, आणि कधी चोरी पचवू नये.”

यातून आपण असा बोध घ्यावा की, “कोणीही कधीही कोणाला फसवू नये आणि चोरी करू नये.

🔺️ चित्ररूप पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »