सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 259दि.07/06/2022

           छान छान गोष्टी भाग 259

वाचा रे वाचा!






       मंगळवार दि.07/06/2022

साईबाबांचे ज्ञानाचे महत्व

 एके दिवशी नित्यनियमाप्रमाणे बाबा पाच घरी भिक्षा मागून येत होते, तेव्हा त्यांना रस्त्यात काही मुले गोटया खेळताना दिसली. त्यातील तीन मुले शाळा सोडून आली होती व दोन मुले शाळेतच गेली नव्हती. 

एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणाला, “मी तुझ्या बाबांना सांगणार आहे, तू शाळेत गेला नाहीस म्हणून. “ते ऐकून तो मुलगा जोरात ओरडू लागला. त्यांचा आरडा ओरडा बाबांनी ऐकला व बाबांच्या लक्षात आले की, शाळेची वेळ असून सुध्दा मुलं शाळा सोडून खेळत आहेत. हे अगदी चुकीच आहे. जर यांना शाळा सोडून खेळायची सवय लागली तर ही सर्व मुल शाळा सोडून देतील. आपण त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. बाबांनी जवळ जाऊन मुलांना विचारले, “कोण कोण शाळा बुडवुन गोटया खेळणारे आहात?” ती मुल बिचारी घाबरली व बाबांसमोर उभी राहीली. पूर्वीच्या काळी मुल गुरूजींना व इतर मोठया माणसांना घाबरत असत. गुरूजींना सांगतो असे म्हटले की ते खूप घाबरत असत. अशी भीती त्यांना होती म्हणून त्यांनी बाबांची माफी मागितली.

तेव्हा बाबा त्या मुलांना म्हणाले, “मुलांनो शाळा कधीही बुडवू नये. कारण शाळा हे एक ज्ञान मंदीर आहे. जर तुम्ही शाळेत गेले नाही तर तुम्हाला ज्ञान कसे मिळणार? आपला विकास शाळेतून होतो म्हणून शाळा हे एक विकासाचे केंद्र आहे. म्हणून तुम्ही कोणीही यापुढे शाळा बुडवू नका.”

त्या मुलांच्या समोर बाबांचा उपदेश होता म्हणून ती मुले रोज शाळेत जात होती. आणि बाबांचा हा उपदेश इतरांना देत होती. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होत होती. मुलांच्या पाठीवर बाबांचे हात पडत होते व मुलांची प्रगती होत होती.

जी मुल खूप लहान होती ती मुल शाळेतून आल्यावर बाबा त्यांना विचारत असे, “तू शाळेत गेला होतास ना! ” मुलगा ‘हो’ म्हणायचा. तेव्हा बाबा त्याला शाबासकी देत. बाबा तेव्हा मुलांना आपल्याजवळील खाऊ देत. त्यामुळे बाबा सर्वांना फार आवडायचे. बाबांमध्ये व मुलांमध्ये अतिशय जवळीकतेच नात निर्माण होत असे. बाबा म्हणत ‘मुलांना शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे.’

या कथेतून आपल्याला असे कळते की, शाळा हे संस्काराच व मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. या केंद्रावर कोणत्याही प्रकारचा व्यापार होत नाही किंवा कोणताही भ्रष्टाचार होत नाही. येथे विनामूल्य माणसं चांगली व सुसंस्कृत बनली जातात. म्हणून या शाळेला एक ज्ञान मंदिर म्हटले जाते.

     📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट 

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »