सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 81दि.28/10/2021

      छान छान गोष्टी भाग 81

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       गुरुवार दि.28/10/2021

वीर अभिमन्यू

 कुरुक्षेत्रावर कौरवपक्षाकडील रथी-महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन वीरमरण पत्करणारा अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच शूर होता. त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्या बालवीराने दाखवलेल्या शौर्याची तुलनाच होऊ शकत नाही.

कौरव-पांडवांचे युद्ध झाले, त्या वेळी द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती होते. पांडवांच्या सेनेकडून सतत पराभव पत्करावा लागल्यामुळे ते दु:खी होते. पांडवांचा पराभव करण्यासाठी द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची चक्रव्यूह रचना केली. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांविना कोणालाही हा चक्रव्यूह भेदून जाता येणार नाही, हे द्रोणाचार्यांना ठाऊक होते. श्रीकृष्णाने हाती शस्त्र धरणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती आणि अर्जुन युद्धभूमीपासून दूर लढाईत गुंतला होता. आता काय करावे ? पांडव चिंतेत पडले. एवढ्यात अभिमन्यू पुढे आला नि धर्मराजांना म्हणाला, ”काका, मला आज्ञा द्या, मी हा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश करीन. आपण काळजी करू नये.”

धर्मराजांना अभिमन्यूचा पराक्रम ठाऊक होता; पण लहान मुलाला कशी परवानगी द्यावी, हे कळेना. अभिमन्यूच्या हट्टापायी मोठ्या नाईलाजाने त्यांनी त्याला परवानगी दिली. त्या वेळेला अभिमन्यू केवळ सोळा वर्षांचा होता.

धर्मराज आणि अन्य पांडव यांचा आशीर्वाद घेऊन अभिमन्यू कौरव सेनेने रचलेल्या त्या चक्रव्यूहात शिरला. त्याच्यासमवेत त्याचे सैन्य होते. लढत लढत तो फार पुढे गेला. त्याची आणि सैन्याची चुकामुक झाली, तरी तो सारखा पुढे पुढे जात राहिला. अभिमन्यूने हत्ती, घोडे, सैन्य यांचा नाश चालवला. त्याने द्रोणाचार्य आणि इतर वीरांना फार त्रासवून सोडले. त्याचे शौर्य पाहून कौरवही आश्चर्यचकित झाले. अभिमन्यू लढता लढता बेशुद्ध पडला. तशा अवस्थेत असतांना दु:शासनाने त्याच्यावर गदेचा प्रहार केला. तेव्हा अभिमन्यूचा अंत झाला.

अभिमन्यू मरण पावला असतांना जयद्रथाने त्याच्या डोक्यावर लाथ मारली. मोठमोठ्या वीरांना भारी पडणारा चिमुकला वीर अभिमन्यूच्या शवाला अनादराने लाथ मारल्यामुळे पांडवांना राग आला. त्याच क्षणी अर्जुनाने जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे प्रतिज्ञा पूर्ण करून अर्जुनाने आपल्या पुत्राच्या वधाचा सूड घेतला.

तात्पर्य :- शौर्य आणि धैर्य असावे, तर असे. अभिमन्यूने लहान वयातच अतुलनीय पराक्रम गाजवला. कुठलीही गोष्ट शौर्यानेच प्राप्त होते.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : आईसक्रीम 

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.

      THANKS FOR VISIT 

Previous
Next Post »